शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य
राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य-
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. २) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आला. ३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. ४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती देणे. आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.
६ मे १९२२ रोजी शाहु महाराजांचे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये देहावसान झाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा