Red Spinning Frozen Snowflake

बुधवार, ५ मार्च, २०२५

विज्ञानजगत

 विज्ञानजगत  प्रश्न आणि उत्तरे


1️⃣ प्रश्न: सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: गुरु (Jupiter) हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.


2️⃣ प्रश्न: मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?

उत्तर: जन्माच्या वेळी ३०० हाडे असतात, पण प्रौढावस्थेत ती २०६ हाडांमध्ये एकत्र होतात.


3️⃣ प्रश्न: विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

उत्तर: अमीटर (Ammeter) विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते.


4️⃣ प्रश्न: पृथ्वी आपल्या अक्षावर किती अंश झुकलेली आहे?

उत्तर: पृथ्वी २३.५ अंश झुकलेली आहे.


5️⃣ प्रश्न: प्रकाशाचा वेग किती असतो?

उत्तर: प्रकाशाचा वेग साधारणतः २९९,७९२,४५८ मीटर प्रति सेकंद (सुमारे ३ लाख किमी/से) असतो.


6️⃣ प्रश्न: मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?

उत्तर: त्वचा (Skin) हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे.


7️⃣ प्रश्न: पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर: पाण्याचे रासायनिक सूत्र H₂O आहे.


8️⃣ प्रश्न: न्यूटनचे गतीचे तिसरे नियम काय सांगतो?

उत्तर: "प्रत्येक क्रियेला समप्रमाणात व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते." (Every action has an equal and opposite reaction.)


9️⃣ प्रश्न: पृथ्वीला एक पूर्ण फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो?

उत्तर: पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला २४ तास आणि सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस ६ तास लागतात.


🔟 प्रश्न: कोणत्या वायूमुळे आपण श्वास घेतो?

उत्तर: **प्राणवायू (Oxygen


बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

शिवजयंती

           






           


शिवाजी महाराजांनी आपल्या काळात महिलांचा आदर आणि सन्मान कायम राखला. पनवेलजवळच्या प्रबळगडच्या लढाईत किल्लेदार केसरीसिंह मारला गेला, तेव्हा त्याच्या परिवाराला सुरक्षितपणे त्यांच्या गावी पाठवले. शिवरायांच्या धोरणानुसार राजकीय विरोधकांच्या महिलांनाही सन्मान मिळाला, ज्यामुळे त्यांच्या नैतिकतेचे दर्शन होते. मोगल इतिहासकार खाफीखानानेही म्हटले आहे की, शिवाजी महाराज स्त्रियांना समानतेने वागवत.मातृश्री राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी महत्त्वाच्या घटनांमध्ये महिलांना सहभाग दिला. शिवाजी महाराजांच्या या धोरणामुळे संभाजी महाराजांच्या राणी येसूबाई आणि राजाराम महाराजांच्या राणी ताराराणी यांसारख्या महिलांनी स्वराज्याचे रक्षण केले.

           शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात होती आणि महिलांना सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार होता. आजही त्यांच्या महिला सन्मानाच्या धोरणाची गरज आहे, ज्यामुळे आपण सर्वांनी सामंजस्याने वागावे, हेच खरे शिवकार्य आहे. शिवाजी महाराजांनी नेहमी नैतिकतेचा आणि आदराचा मार्ग स्वीकारला, जे त्यांच्या जीवनातले एक महत्त्वाचे धडे आहेत.



शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

मराठी भाषेला अभिजात दर्जा

 
मा.प्रधानमंञीजी  महोदय मनःपूर्वक धन्यवाद !!

जाणून घेऊ या

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या काय असतात त्याचे फायदे  केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय फायदा होतो जाणून घ्या.ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) या बाबत निर्णय घेत असतो. आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

              अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात

1) भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.

2) भाषेतील प्राचीन साहित्य  मौल्यवान असावे.

3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.


अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.

3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

                   सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

बुधवार, २६ जून, २०२४

BTS EXAM RESULT

 💫💫💫💫💫💫💫💫    *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*🎉🎉🎉🎉 जि.प.प्रा.शाळा किणी येथील  विद्यार्थ्यांंची यशस्वी वाटचाल       *NEP ट्वेंटी-ट्वेंटी* अभ्यासक्रमावर आधारित असलेली BTS-               *भारत टॅलेंट सर्च परीक्षा*  *जिल्हात तिसरा क्रमांक प्रगती विकास दंडनाईक* सातवी तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक                                 💫 *प्रगती विकास दंडनाईक* सातवी  ,                    *द्वितीय*                           💫 *अनिता विठ्ठल कुंभार ,*                  *तृतीय* 💫 *अक्षरा नितीन शिंदे*  सातवी                       *तसेच सर्व  BTS परिक्षेतील   यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकवर्गांंचे अभिनंदन* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸   यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे     👇🏻                                                                                                                                                                        💫 *हाजगुडे जान्हवी निलेश तिसरी* 

 💫 *स्वरांगी ज्योतीराम तिसरी* 

💫 *श्रावणी विश्वनाथ तिसरी*                                                                                                                                            💫 *प्राची  विकास  दंडनाईक  चौथी                                                                                                                                               💫 *स्वरांजली आण्णासाहेब* *कासतकर  चौथी*                 💫 *सोनल संभाजी लंगाळे  चौथी                                                                                                                                                    💫कुंभार प्रणिता धनाजी सहावी**                                                                                                                                                      💫 *शिंदे  शिवानी विनोद  सहावी                                                                                                                                                                💫भुतेकर स्वप्नाली उमेश सहावी                                                                                                                                                            💫कुंभार अक्षता तुकाराम सहावी*                                                                                                                                                        💫 *लंगाळे पूर्वा प्रमोद इयत्ता सहावी                                                                                                                                            💫 *रसाळ रोशनी काशिनाथ* सहावी** 

💫 *शितोळे संस्कृती मनोज सहावी*                                                                                                                                                      💫 **साक्षी बालाजी पवार  सातवी* 

💫 *शिंदे  कल्याणी  विनोद सातवी* 

💫 *सौरभ दिनकर मोरे  सातवी                                                                                                                                                           💫सुदर्शन सुनिल  शितोळे* सातवी                                                                                                                                                    💫 *लंगाळे  सार्थक रवींद्र सातवी* 

💫 **बगाडे  संतोष  शिवाजी*  सातवी

💫 *घुटे  यश विकास    सातवी**     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫 लवकरच प्रमाणपञ प्राप्त होतील.

मंगळवार, २५ जून, २०२४

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त अभिवादन

 शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य-





            राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

                 राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. २) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आला. ३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. ४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती देणे. आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.

               ६ मे १९२२ रोजी शाहु महाराजांचे  मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये  देहावसान झाले.












रविवार, १२ मे, २०२४

डोके चालवा

 

💫💫  डोके चालवा 😇💫💫         

 आजचा प्रश्न                  सी व्ही रामन यांना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले?

उत्तर  सी,.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, 1947  साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे 6 मे 1907रोजी लोकासुंदरी अम्मल 1892-1980) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. 1983[ मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.


शनिवार, ११ मे, २०२४

डोके चालवा

💫💫  डोके चालवा 😇💫💫          आजचा प्रश्न   फेब्रुवारी या दिवशी कोणत्या वैज्ञानिकाने  त्यांचे वैज्ञानिक शोध  जाहीर केले होते व त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले होते?

उत्तरज्या

        ज्या दिवशी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण (सीव्ही रमण) यांनी 1928 मध्ये “रामन इफेक्ट” शोधण्याची घोषणा केली त्या दिवशी प्रथम राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला, ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.


शुक्रवार, १० मे, २०२४

जरा डोके चालवा

 

💫💫  डोके चालवा 😇💫💫          आजचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो?                       History and Theme of World Health Day: जागतिक आरोग्य दिन दरवर्षी     *७ एप्रिल* रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित अधिकारांबद्दल जागरूक केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

**********************************************************