Red Spinning Frozen Snowflake

रविवार, ९ मार्च, २०२५

विज्ञानजगत 4

 



31  प्रश्न: आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते?

उत्तर: Milky Way (आकाशगंगा)

32. प्रश्न: पृथ्वी किती कोनात परिभ्रमण करते?

उत्तर: 23.5°

33. प्रश्न: सूर्य कोणत्या वायूंनी बनलेला आहे?

उत्तर: हायड्रोजन (Hydrogen) आणि हीलियम (Helium)

34. प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे?

उत्तर: शुक्र (Venus)

35 प्रश्न: मानवाच्या रक्ताचा रंग लाल का असतो?

उत्तर: रक्तात हिमोग्लोबिन (Hemoglobin) असल्यामुळे

36 प्रश्न: पृथ्वीभोवती कोणते वायूचे आवरण असते?

उत्तर: वातावरण (Atmosphere)

37. प्रश्न: मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे?

उत्तर: त्वचा (Skin)

38. प्रश्न: पाणी कोणत्या रासायनिक सूत्राने ओळखले जाते?

उत्तर: H₂O

39.प्रश्न: प्रकाशाचा वेग किती असतो?

उत्तर: 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद (3,00,000 km/s)

40प्रश्न: सजीवांना उष्णता व प्रकाश कोणत्या ग्रहापासून मिळतो?

उत्तर: सूर्य (Sun)

शनिवार, ८ मार्च, २०२५

विज्ञानजगत -3

 प्रश्न:21  कोणत्या वायूला ‘हास्यवायू’ म्हणतात?

उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N₂O)


प्रश्न22: अम्ल आणि अल्कली ओळखण्यासाठी कोणते संकेतक वापरले जातात?

उत्तर: लिटमस पेपर, फेनॉल्फ्थेलेन


प्रश्न:23 कोणता वायू लोखंड गंजवतो?

उत्तर: ऑक्सिजन (O₂) आणि पाणी (H₂O)


प्रश्न:24 डायनॅमाइटमध्ये कोणता प्रमुख रासायनिक घटक असतो?

उत्तर: नायट्रोग्लिसरीन (Nitroglycerin)

प्रश्न: 25 वनस्पती हिरव्या का दिसतात?

उत्तर: कारण त्यामध्ये क्लोरोफिल (Chlorophyll) असते.


प्रश्न: 26 रक्ताचा रंग लाल का असतो?

उत्तर: कारण त्यात हीमोग्लोबिन (Hemoglobin) असते.


प्रश्न: 27 मानवी शरीरात एकूण कितक्या हाडे असतात?

उत्तर: 206 हाडे


प्रश्न: 28 कोणता अवयव रक्त शुद्ध करतो?

उत्तर: मूत्रपिंड (Kidney)


प्रश्न:  29 सर्वात मोठा अवयव कोणता आहे?

उत्तर: त्वचा (Skin)


प्रश्न:  30 चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?

उत्तर: नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong)

गुरुवार, ६ मार्च, २०२५

विज्ञानजगत -2

 11  प्रश्न: कोणत्या वायूशिवाय मानव जगू शकत नाही?

उत्तर: प्राणवायू (Oxygen)


12' प्रश्न: इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?

उत्तर: जे. जे. थॉमसन (J. J. Thomson)


13 प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर: H₂O


14. प्रश्न: सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे?

उत्तर: चीता (Cheetah)


16  न्यूटनच्या गतीचे तिसरे नियम काय सांगतो?


उत्तर: प्रत्येक क्रियेस समदृढ व विपरीत प्रतिक्रिया असते.


17 ध्वनीचा वेग   हवेपेक्षा पाण्यात जास्त का असतो?उ


उत्तर: कारण पाणी हवेपेक्षा अधिक द्रव्यमान आणि घट्ट असते.


18 प्रश्नृ: किरणोत्सर्ग (Radiation) शोधणारे शास्त्रज्ञ कोण?


उत्तर: हेन्री बेक्करल (Henri Becquerel)


19 : प्रश्न  किलोमध्ये किती ग्रॅम असतात?

उत्तर: 1000 ग्रॅम                  

 20 प्रश्न  सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?  

उत्तर: Au


बुधवार, ५ मार्च, २०२५

विज्ञानजगत

 विज्ञानजगत  प्रश्न आणि उत्तरे


1️⃣ प्रश्न: सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: गुरु (Jupiter) हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.


2️⃣ प्रश्न: मानवाच्या शरीरात किती हाडे असतात?

उत्तर: जन्माच्या वेळी ३०० हाडे असतात, पण प्रौढावस्थेत ती २०६ हाडांमध्ये एकत्र होतात.


3️⃣ प्रश्न: विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?

उत्तर: अमीटर (Ammeter) विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते.


4️⃣ प्रश्न: पृथ्वी आपल्या अक्षावर किती अंश झुकलेली आहे?

उत्तर: पृथ्वी २३.५ अंश झुकलेली आहे.


5️⃣ प्रश्न: प्रकाशाचा वेग किती असतो?

उत्तर: प्रकाशाचा वेग साधारणतः २९९,७९२,४५८ मीटर प्रति सेकंद (सुमारे ३ लाख किमी/से) असतो.


6️⃣ प्रश्न: मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?

उत्तर: त्वचा (Skin) हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे.


7️⃣ प्रश्न: पाण्याचा रासायनिक सूत्र काय आहे?

उत्तर: पाण्याचे रासायनिक सूत्र H₂O आहे.


8️⃣ प्रश्न: न्यूटनचे गतीचे तिसरे नियम काय सांगतो?

उत्तर: "प्रत्येक क्रियेला समप्रमाणात व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते." (Every action has an equal and opposite reaction.)


9️⃣ प्रश्न: पृथ्वीला एक पूर्ण फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो?

उत्तर: पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला २४ तास आणि सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस ६ तास लागतात.


🔟 प्रश्न: कोणत्या वायूमुळे आपण श्वास घेतो?

उत्तर: **प्राणवायू (Oxygen


बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

शिवजयंती

           






           


शिवाजी महाराजांनी आपल्या काळात महिलांचा आदर आणि सन्मान कायम राखला. पनवेलजवळच्या प्रबळगडच्या लढाईत किल्लेदार केसरीसिंह मारला गेला, तेव्हा त्याच्या परिवाराला सुरक्षितपणे त्यांच्या गावी पाठवले. शिवरायांच्या धोरणानुसार राजकीय विरोधकांच्या महिलांनाही सन्मान मिळाला, ज्यामुळे त्यांच्या नैतिकतेचे दर्शन होते. मोगल इतिहासकार खाफीखानानेही म्हटले आहे की, शिवाजी महाराज स्त्रियांना समानतेने वागवत.मातृश्री राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी महत्त्वाच्या घटनांमध्ये महिलांना सहभाग दिला. शिवाजी महाराजांच्या या धोरणामुळे संभाजी महाराजांच्या राणी येसूबाई आणि राजाराम महाराजांच्या राणी ताराराणी यांसारख्या महिलांनी स्वराज्याचे रक्षण केले.

           शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात होती आणि महिलांना सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार होता. आजही त्यांच्या महिला सन्मानाच्या धोरणाची गरज आहे, ज्यामुळे आपण सर्वांनी सामंजस्याने वागावे, हेच खरे शिवकार्य आहे. शिवाजी महाराजांनी नेहमी नैतिकतेचा आणि आदराचा मार्ग स्वीकारला, जे त्यांच्या जीवनातले एक महत्त्वाचे धडे आहेत.



शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

मराठी भाषेला अभिजात दर्जा

 
मा.प्रधानमंञीजी  महोदय मनःपूर्वक धन्यवाद !!

जाणून घेऊ या

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, जाणून घ्या काय असतात त्याचे फायदे  केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर काय फायदा होतो जाणून घ्या.ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) या बाबत निर्णय घेत असतो. आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

              अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात

1) भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.

2) भाषेतील प्राचीन साहित्य  मौल्यवान असावे.

3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.


अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.

3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

                   सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.

बुधवार, २६ जून, २०२४

BTS EXAM RESULT

 💫💫💫💫💫💫💫💫    *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*🎉🎉🎉🎉 जि.प.प्रा.शाळा किणी येथील  विद्यार्थ्यांंची यशस्वी वाटचाल       *NEP ट्वेंटी-ट्वेंटी* अभ्यासक्रमावर आधारित असलेली BTS-               *भारत टॅलेंट सर्च परीक्षा*  *जिल्हात तिसरा क्रमांक प्रगती विकास दंडनाईक* सातवी तर तालुकास्तरावर प्रथम क्रमांक                                 💫 *प्रगती विकास दंडनाईक* सातवी  ,                    *द्वितीय*                           💫 *अनिता विठ्ठल कुंभार ,*                  *तृतीय* 💫 *अक्षरा नितीन शिंदे*  सातवी                       *तसेच सर्व  BTS परिक्षेतील   यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकवर्गांंचे अभिनंदन* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸   यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे     👇🏻                                                                                                                                                                        💫 *हाजगुडे जान्हवी निलेश तिसरी* 

 💫 *स्वरांगी ज्योतीराम तिसरी* 

💫 *श्रावणी विश्वनाथ तिसरी*                                                                                                                                            💫 *प्राची  विकास  दंडनाईक  चौथी                                                                                                                                               💫 *स्वरांजली आण्णासाहेब* *कासतकर  चौथी*                 💫 *सोनल संभाजी लंगाळे  चौथी                                                                                                                                                    💫कुंभार प्रणिता धनाजी सहावी**                                                                                                                                                      💫 *शिंदे  शिवानी विनोद  सहावी                                                                                                                                                                💫भुतेकर स्वप्नाली उमेश सहावी                                                                                                                                                            💫कुंभार अक्षता तुकाराम सहावी*                                                                                                                                                        💫 *लंगाळे पूर्वा प्रमोद इयत्ता सहावी                                                                                                                                            💫 *रसाळ रोशनी काशिनाथ* सहावी** 

💫 *शितोळे संस्कृती मनोज सहावी*                                                                                                                                                      💫 **साक्षी बालाजी पवार  सातवी* 

💫 *शिंदे  कल्याणी  विनोद सातवी* 

💫 *सौरभ दिनकर मोरे  सातवी                                                                                                                                                           💫सुदर्शन सुनिल  शितोळे* सातवी                                                                                                                                                    💫 *लंगाळे  सार्थक रवींद्र सातवी* 

💫 **बगाडे  संतोष  शिवाजी*  सातवी

💫 *घुटे  यश विकास    सातवी**     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫 लवकरच प्रमाणपञ प्राप्त होतील.

मंगळवार, २५ जून, २०२४

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त अभिवादन

 शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांचे शैक्षणिक कार्य-





            राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.

                 राजर्षी शाहू महाराजांनी जे शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले त्या हिताच्या दृष्टीने अलौकिक कार्य केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने १) विदयार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. २) शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आला. ३) विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. ४) विदयार्थ्यांना विविध सोयी सवलती देणे. आपल्या शिक्षणातून आणि तसेच अभ्यासक्रमातून म. फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे सामजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपातील विचार आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करीत असतात. त्याचे विचार २१ व्या शतकात आपल्या विदयार्थी वर्गाला नव्याने देणे आवश्यक आहे. कारण आपली पिढी भरकटत चालली तेव्हा त्यांना या महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल.

               ६ मे १९२२ रोजी शाहु महाराजांचे  मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये  देहावसान झाले.












**********************************************************