Red Spinning Frozen Snowflake

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

रुबेला व गोवर


गोवर आणि रुबेला


लहान मुलांमध्ये येणाऱ्या तापाची अनेक कारणे असू शकतात. सध्या विषाणूजन्य आजाराचे वाढते प्रमाण बघता, जेव्हा पालक ताप हे प्रामुख्याने लक्षण घेऊन बालकांना बालरोगतज्ज्ञांकडे येतात, तेव्हा तापाबरोबर अंगावर पुरळ, लाल चट्टे असे काही आहे का बघितले जाते. ताप आणि त्यानंतर येणारी ‘रॅश’ किंवा पुरळ यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात आणि त्यानुसार रोगाचे निदान करता येते. गोवर, रुबेला, स्कारलेट फीवर, इन्फेक्शन मोनोन्यूक्लिओसीस, डेंग्यू, कावासाकी, हॅण्ड फूट माऊथ डिसीज आदी आजारांमध्ये ताप आणि त्याबरोबर येणारे पुरळ बघून त्या आजारांचे निदान करता येते.

गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक असून त्याबाबत जाणून घेऊ या. गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो.


गोवरची प्रमुख लक्षणे – तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे

गोवरमध्ये पुरळ प्रथम कपाळावर, कानामागे, मानेवर येतात. नंतर ते हाता-पायापर्यंत पसरते. रॅश किंवा पुरळ आल्यानंतर हळूहळू तापाचे प्रमाण कमी होते. पुरळ साधारणपणे आठवडय़ानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते. ताप व तापात येणारे झटके कधीकधी मेंदूच्या आवरणांना सूज येऊन कोमामध्ये जाण्याचा धोका काही बालकांमध्ये दिसून येतो.

उपचार – गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट असे औषध त्यावर नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे. ज्यांना श्वसनाला त्रास होत आहे, त्यांना ऑक्सिजन किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणे. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गोवरच्या आजाराचे स्वरूप तीव्र होऊ शकते. काही परिस्थितीमध्ये बाळ दगावण्याचीही शक्यता असते. कुपोषित बालकांमध्ये गोवरचे प्रमाण जास्त दिसून येते.

जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा – सहा महिने ते एक वर्ष वयाच्या बालकांमध्ये एक लाख आययू (इंटरनॅशनल युनिट), तर एक वर्षांवरील बालकांमध्ये दोन लाख आययू जीवनसत्त्व ‘अ’चे औषध तोंडावाटे दिले जाते. डोळ्यांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता असणाऱ्या बालकांना हे औषध दुसऱ्या दिवशी व दोन आठवडय़ांनंतर असे परत द्यावे लागते.

प्रतिबंधात्मक लस – गोवर टाळण्यासाठी लसीकरण कार्यक्रमामधून लस दिली जाते. गोवरची पहिली लस नऊ ते १२ महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटांत देण्यात येते. पहिल्या लसनंतर साधारणपणे ८५ टक्के प्रतिकारशक्ती मिळते, तर दुसऱ्या लसनंतर ९५ टक्के प्रतिकारशक्ती मिळते.


लोकसत्ता टीम | Updated: October 16, 2018 2:45 am

पाण्यामार्फत पसरणारे रोग


पाण्यामुळे पसरणारे रोग
Suresh Ranade  6:23:00 AM

टायफाईड चा ताप व कॉलरा हे आतड्याचे रोग असून त्यांचा प्रसार पाण्यामुळे होतो हे सिद्ध झाल्यावर प्रभावी निसंयदन (फिल्ट्रेशन) क्रिया व क्लोरिनीकरण करून पाण्यावर व त्यायोगे या रोगांवर नियंत्रण करण्यात यश मिळाले. भोवतालचे वातावरण आरोग्य प्रद राखण्याच्या शास्त्रातील ही पहिली महत्वाची प्रगती होय. या ज्ञानाचा उपयोग कित्येक देशांत इतक्या प्रभावीपणे केला आहे की तेथे टायफाईड व कॉलरा या रोगाचे प्रमाण अगदी कमी झाले आहे. अर्थात ज्या देशात अजूनही पाण्यामुळे नेहमी रोगप्रसार होतो त्या ठिकाणी मात्र अजून सुधारणा करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यात रोगजंतू असतील तर त्याच्यामुळे टायफाईडचा (Bacillary), हगवण (Disentry), कॉलरा (Paratyphoide Fever) व तितकाच गंभीर स्वरूपाचा नसणारा पॅराटायफाईडचा ताप हे रोग होऊ शकतात.

पाण्यात निरनिराळे जीवाणू असतील तर निश्चित स्वरूप सांगता न येणारे अपचनाचे विकार उद्भवतात. टायफाईड ताप व कॉलरा हे रोग पसरू नयेत म्हणून ज्या पद्धती वापरण्यात येतात त्यामुळे या रोगांचाही बंदोबस्त होतो. अमिबामुळे जडणारा हगवण हा रोग ‘एंडा अमिबा हिस्टोलिटीका’ या नावाने प्रोटोझोआमुळे होतो. पाण्यातील ज्या जिवाणूंमुळे रोग पसरतात. त्यात हाच एकमेव प्रोटोझोन असतो. पाण्यात असणाऱ्या एका प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळ (Infectious Lepatiti) हा रोग होतो व इतर काही अज्ञात विषाणूंमुळे अपचनाचे विकार जडतात. (या विषयावरील सविस्तर माहितीसाठी मिलर, १९६२ हे पुस्तक पहा.)


 वर सांगितलेल्या रोगांचा प्रसार खालील प्रमाणे ज्यांना हे रोग झाले आहेत वा ज्याच्या शरीरात याचे रोगजंतू आहेत अशा माणसाच्या विष्टेवाटे आतड्यातील रोगजंतू बाहेर पडतात. ते जर पाण्यात मिसळून पाणी दुषित झाले व जीवाणू मारण्यासाठी वा काढून टाकण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया केली नाही तर रोगजंतूंचा पाण्यामुळे प्रसार होतो व रोग फैलावतो. म्हणून अशा रोग प्रसारास आळा बसण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करावा. (अ) वरीलपैकी एखाद्या रोगाने घरातील व्यक्ती आजारी असेल तर तिची विष्टा लगेच निर्जंतुक करणे (आ) मलजलावर प्रक्रिया करणे. (इ) स्वयंशुद्धीक्रियेचा उपयोग करून घेणे (ई) आवश्यक पडेल तेव्हा पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणे.

 टायफाईड तापाच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी खाली जी पद्धत सांगितली आहे त्यामुळे पटकी, पराविषमज्वर ताप व अपचनाचे विकार यांच्या रोगजंतूंचाही नाश होतो. एम्डा अमिबा हिस्टोलिटीका या प्रोटोझोआची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने नेहमीच्या जंतुनाशकांचा त्याच्यावर विशेष परिणाम होत नाही. त्याचा नाश करण्यासाठी शेष क्लोरिनचे प्रमाण ८ ते १० भा / दलभा इतके जास्त ठेवावे लागते. सुदैवाने हा जीवाणू निस्पंदन क्रिया प्रभावी असल्याने पाण्यातून वेगळा केला जातो. मात्र कोण्याही परिस्थितीत अॅमिबामुळे होणाऱ्या हगवण या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत असेल तर पाण्याचे फार प्रदुषण झाले आहे असे समजण्यास हरकत नसते. हे जिवाणू जेथे विपुल प्रमाणात असतात त्या सांडपाण्याचे नळ जर घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळव्यवस्थेस चुकून जोडले गेले तर पाण्याचे असे अति प्रदुषण होऊ शकते. अर्थात अॅमिबामुळे होण्याऱ्या हगवण या रोगाचा प्रसार पाण्यामुळे सर्व भागात झाल्याची अजून पर्यत तरी नोंद नाही.

 पिण्याच्या पाण्यावाटे कावीळ या विषाणू रोगाचा प्रसार होण्यासाठी देखील पाण्याचे असेच अति प्रदुषण व्हावे लागते. अभ्यासावरून असे दिसून आले व निस्पंदन क्रिया प्रभावी असतील तर तयार झालेल्या पुंजक्यांमुळे ९० ते ९९ टक्के विषाणू पाण्यातून वेगळे करता येतात. राहिलेले अगदी लहान विषाणू मात्र निस्पंदन टाकीत न अडकता तसेच पाण्याबरोबर पुढे जातात. या अभ्यासामुळे असेही आढळून आले की पुढील पद्धत वापरल्यास या विषाणूंचा प्रभावीपणे नाश करता येतो. प्रथम पाण्यात राहील अशा रितीने पूर्व क्लोरिनीकरण करावे म्हणजे अवसादन टाकीत व निस्पंदन क्रियेत पुरेसा संपर्क काल उपलब्ध होईल. नंतर शेवटच्या बहिर्गत पाण्यात ०.३ ते ०.४ भा/दलभा एवढया प्रमाणात मुक्त शेष क्लोरिन राहील एवढया प्रमाणात पश्चात क्लोरिनीकरण करावे.

 अपचनाच्या रोगास कारणीभूत होणारे विशिष्ट रोगजंतू माणसाच्या विष्टेत सापडत नाहीत तेव्हा हे रोगही काही विषाणूमुळे होत असण्याची शक्यता आहे. या विषाणूंचा व आतड्यात असणाऱ्या इतर विषाणूंचाही पाण्यात मुक्त शेष क्लोरिनीकरण करून नाश करता येतो. मुक्तशेष क्लोरिनचे आवश्यक असणारे प्रमाण ठरविण्यासाठी अधिक संशोधन होणे जरूरीचे आहे. पण तोपर्यत कावीळ या रोगाचे विषाणू नाहीसे करण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण मार्गदर्शक म्हणून धरण्यास हरकत नाही. पाण्यामुळे होणाऱ्या रोगांच्या साथीचा इतिहास पहिला तर असे स्पष्टपणे दिसून येते की या साथ
**********************************************************